बेंगळुरू येथील 14 वर्षीय सूर्य उत्कर्ष याने वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी एका मोठ्या रस्ते अपघाताचा अनुभव घेतला होता. या अपघाताने सूर्याला भारतात रस्ते सुरक्षेबाबत पुरेशी जागरूकता आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचा प्रत्यक्ष अनुभव दिला. कालांतराने इतर अपघातग्रस्तांच्या संपर्कात आल्यावर त्याला याबाबत काहीतरी ठोस करावे असे वाटू लागले आहे. दोन वर्षांपूर्वी, वयाच्या 12 व्या वर्षी त्याने ‘द मार्ग इनिशिएटिव्ह’ ही …
Read More »इराणची पाठराखण: भारताचे धोरणात्मक पाऊल
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये इराणविरुद्ध मांडण्यात आलेल्या मानवाधिकार उल्लंघनाच्या प्रस्तावाविरोधात मतदान करून भारताने आपल्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची आणि इराणसोबतच्या धोरणात्मक संबंधांची प्रचिती पुन्हा एकदा जगाला दिली आहे. पाश्चात्य देशांनी आणलेला हा प्रस्ताव प्रामुख्याने इराणमध्ये गेल्या वर्षाच्या शेवटी सुरू झालेल्या देशव्यापी निदर्शनांशी संबंधित होता, ज्यामध्ये मानवी हक्कांच्या पायमल्लीचा आरोप करण्यात आला होता. या प्रस्तावात इराण सरकारने आंदोलकांवर केलेल्या अमानुष बलप्रयोगाचा आणि …
Read More »स्वच्छ इंधनासाठी हवी भरीव गुंतवणूक
जीवाश्म इंधनाच्या (फॉसिल फ्युएल) बेसुमार वापरामुळे निर्माण झालेल्या हवामान संकटामुळे आज संपूर्ण जगाला स्वच्छ इंधनाची निकड भासू लागली आहे. मात्र, या दिशेने होणारे प्रयत्न अत्यंत अपुरे असल्याचे दिसून येते. स्वच्छ इंधन आणि अक्षय ऊर्जेबाबत (रिन्यूएबल एनर्जी) कागदावर अनेक योजना आखल्या जात असल्या तरी, त्यांच्या अंमलबजावणीचा वेग कमालीचा संथ आहे. आजही जगाचा कल जीवाश्म इंधनावरच अधिक असल्याने, हवामान बदलाबाबत जागतिक स्तरावर …
Read More »अजित पवार यांना अखेरचा निरोप
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास विमान अपघातात निधन झाले. या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला. त्यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात गुरुवारी बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह …
Read More »अर्थपूर्ण ठरो अर्थसंकल्प
गेल्या काही दिवसांपासून देशाचेच नव्हे तर सबंध जगाचे लक्ष संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 कडे लागले आहे. सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर यंदा केवळ देशांतर्गत अपेक्षांचेच नव्हे, तर जागतिक अस्थिरतेचेही मोठे आव्हान आहे. महागाई, बेरोजगारी आणि बदलत्या जागतिक व्यापार समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, हा अर्थसंकल्प भारताच्या भविष्यातील आर्थिक दिशेचा महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार …
Read More »लिव्ह इन ची कोंडी
अलीकडेच मद्रास उच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपच्या वाढत्या प्रस्थवरून चिंता व्यक्त केली. अशा संबंधामध्ये असलेल्या महिलांना जोडीदाराने पत्नीचा दर्जा देऊन सुरक्षा प्रदान करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तरुण मुले-मुली स्वत:ला आधुनिक विचारसरणीचे पाईक मानतात आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. मात्र कालांतरांने या संबंधातून विवाहासंस्थेसारखी सुरक्षा मिळत नसल्याचे लक्षात येते. पश्चिमेकडील संस्कृतीचा अंगीकार करणे म्हणजे पुढारलेपण असा …
Read More »स्वतःची ओळख असणे महत्त्वाचे ः सुनीता आहुजा
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता आहुजा ही आपल्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीतांनी आपल्या वैयक्तिक ओळखीबद्दल भाष्य करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वयाच्या 55 व्या वर्षी आपण केवळ गोविंदाची पत्नी म्हणून नव्हे, तर सुनीता आहुजा म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. यावेळी त्यांनी राज्यसभेतील जया बच्चन यांच्या गाजलेल्या …
Read More »भावनाप्रधान गीतांचा काळ सरला
हिंदी सिनेसृष्टीतील असंख्य अवीट गीतांनी तीन पिढ्यांहून अधिक काळ भारतीय जनमानसाच्या मनाला मोहिनी घातली. आजही या गीतांची जादू रसिकांच्या मनावर कायम आहे. नव्या रुपामध्ये ही गाणी सादर केली जातात तेव्हा त्यांनाही तितकीच लोकप्रियता लाभते आहे. दुर्दैवाने, आज अशा गाण्यांची कमतरता भासत आहे. यामागचे कारण प्रतिभा संपली आहे असे नसून, हृदयापर्यंत पोहोचणारा रस्ता बदलला आहे आणि तो खूप छोटा करण्यात आला …
Read More »मुलाखतीदरम्यान काय विचारावे?
नोकरी मिळवण्याच्या प्रक्रियेत इंटरव्ह्यू अथवा मुलाखत हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. तुम्हाला कंपनीचे व्यवस्थापक वेगवेगळे प्रश्न विचारून विविध विषयात तुमचे ज्ञान किती आहे हे आजमावून पाहतो. उमेदवारही मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारू शकतो. या प्रश्नांमधून त्या कंपनीमध्ये आपण काम करू शकू की नाही हे कळू शकते. तसेच व्यवस्थापनालाही हा उमेदवार किती पात्रतेचा आहे हे कळू शकते. मुलाखतीच्या वेळी जर उमेदवाराने …
Read More »कपाट ठेवा निटनेटकं
अनेकदा असं होतं की आपल्या कपाटात कपडे भरलेले असतात, पण ऐनवेळी काय घालावं हेच समजत नाही. तुमचंही असंच होत असेल, तर कपाट आवरण्याची वेळ आली आहे असे समजावे. नव्या कपड्यांची खरेदी करण्याऐवजी, आधी जे आहेत ते व्यवस्थित लावल्यास मनालाही शांती लाभेल. वॉर्डरोब मॅनेजमेंट हा आजच्या तरुणींचा आवडता छंद ठरला आहे. पण यासाठीचा मुहुर्त उजाडण्यासच मुळी वेळ लागतो. असो, पण जेव्हा …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र