लेख-समिक्षण

कर्नाटकातील खांदेपालटाचा अन्वयार्थ

कर्नाटकामध्ये अखेर सत्तापालट झाला असून सिद्धरामैया यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदीर्घ ओढाताण आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी आपली खुर्ची डी. के. शिवकुमार यांच्याकडे सोपवली आहे. मे 2028 पर्यंत शिवकुमार हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर या सत्तांतराची रणनीती आखली जात होती. त्याला अखेर सिद्धरामैया यांनी संमती दिली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला, …

Read More »

मॅनिफेस्टेशनचा बोलबाला

हल्ली सोशल मीडियावर रंगणाऱ्या पॉडकास्टमध्ये आणि रिल्समध्ये मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ ॲट्रॅक्शन यांवर आधारीत व्हिडिओ, मुलाखती यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सकारात्मक विचारांमुळे माणसाच्या आयुष्याला योग्य दिशा मिळते, आनंदी आणि निरोगी जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन गरजेचा आहे, हे खरेच आहे; पण विचारांना कृतीची जोड न देता केवळ काल्पनिक क्रियांनी इच्छित गोष्टी साध्य होतात असे मानणे चुकीचे आहे. मानसशास्त्रज्ञ गॅब्रिएल ओटिंजेन यांनी मेंटल …

Read More »

अजय-अनुभवचे पॅचअप!

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा तब्बल 18 वर्षांनंतर एका मोठ्या बजेटच्या ॲक्शन चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. 2007 मधील ‌‘कॅश‌’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर या दोघांमध्ये कोणताही संपर्क नव्हता, मात्र आता त्यांच्यातील दुरावा संपला आहे. अनुभव सिन्हा यांनी स्पष्ट केले होते की, त्यांच्यात वैयक्तिक असा कोणताही वाद नव्हता, तर तो मतभेद चित्रपटाचे निर्माते आणि …

Read More »

‌‘स्टार पॉवर‌’चे वलय आणि चित्रपट

हिंदी चित्रपटसृष्टीत काही दिग्दर्शक असे झाले, ज्यांनी केवळ चित्रपट बनवले नाहीत तर त्यांनी काळाची अभिरुची घडवली. सुभाष घई हे त्यापैकी एक महत्त्वाचे नाव. ‌‘ताल‌’, ‌‘परदेस‌’, ‌‘हीरो‌’, ‌‘राम लखन‌’ किंवा ‌‘खलनायक‌’ यांसारखे चित्रपट पाहताना केवळ मोठे कलाकार दिसत नाहीत, तर त्यामागे उभा असलेला एक ठाम दिग्दर्शकीय दृष्टिकोन जाणवतो. म्हणूनच सुभाष घई यांनी अलीकडे केलेले विधान महत्त्वाचे ठरते. फक्त स्टार पॉवरवर चित्रपट …

Read More »

पहिल्या पगारातून कायापालटाची कहाणी

तुमचा पहिला पगार 120 मुलांचे आयुष्य बदलू शकतो का? स्नेहा शर्मा यांची ही प्रेरणादायी कथा दाखवून देते की, एक छोटेसे पाऊल किती मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकते. बेगुसराय येथील एका सरकारी शाळेतील शिक्षिका असलेल्या स्नेहा यांनी आपला पहिला पगार स्वतःवर खर्च न करता, मूलभूत शैक्षणिक साहित्याची गरज असलेल्या वंचित मुलांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. स्नेहा यांनी मुलांची पाठशाळा या …

Read More »

हारिका ओडेलाची हृदयस्पर्शी गोष्ट

पालकांसाठी आपल्या मुलांचे यश डोळ्यांनी पाहण्यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणताही नसतो. असाच एक भावूक क्षण सध्या समाजमाध्यमांवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बेंगळुरू येथील ‌’ॲमेझॉन‌’ कार्यालयात कार्यरत असलेल्या हारिका ओडेला हिने नुकतीच आपल्या आई-वडिलांना आपल्या कामाच्या ठिकाणी नेले. आपल्या लेकीचे कॉर्पोरेट जगातील यश आणि तिचे कार्यालय पाहून या पालकांच्या चेहऱ्यावर जो अभिमान आणि आनंद झळकला, त्याने इंटरनेटवरील लाखो लोकांची मने …

Read More »

मागणी राणी नेफरतितीच्या पुतळ्याची

इजिप्तच्या तीन-चार हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीच्या खुणा आजही पिरॅमिड, मकबरे व प्राचीन कलाकृतींच्या स्वरूपात पाहायला मिळतात. त्यापैकीच एक कलाकृती म्हणजे 3,370 वर्षांपूर्वीच्या राणी नेफरतितीचा पुतळा. या पुतळ्याचा शोध लागल्यापासून तो जर्मनीतच आहे. एका इजिप्शियन पुरातत्त्वज्ञाने बर्लिनमध्ये असलेला हा राणी नेफरतितीचा अर्धपुतळा परत करण्याची मागणी केली आहे; तर जर्मनीने तसे करण्यास नकार दिला आहे. नेफरतिती प्राचीन इजिप्तच्या इतिहासातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि …

Read More »

आयआयटी पासआऊट चिकन व्यवसायातून कोट्याधीश

तेलंगणाचा रहिवासी असलेल्या सैकेश गौडने आयआयटी वाराणसीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. शिक्षण पूर्ण होताच त्याला सॉफ्टवेअर क्षेत्रात वार्षिक 28 लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळाली. कॉर्पोरेट जगतात उत्तम भवितव्य असतानाही सैकेशच्या मनात स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करण्याचे विचार घोळत होते. याच काळात त्याची भेट हेमाम्बर रेड्डी आणि मोहम्मद सामी उद्दीन यांच्याशी झाली. हेमाम्बर हे त्यावेळी भारतातील मांस उद्योगाचा अभ्यास करत …

Read More »

रेल्वे दुर्घटनांची न संपणारी कहाणी

भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी मानले जाते. दररोज कोट्यवधी नागरिक या यंत्रणेवर विश्वास ठेवून प्रवास करतात. केंद्र सरकारकडून सध्या भारतीय रेल्वेला जागतिक दर्जाचे बनवण्याचे आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करण्याचे मोठे दावे केले जात आहेत. वंदे भारतसारख्या अत्याधुनिक गाड्या रुळांवर धावत आहेत. मात्र, या चकचकाटाच्या मागे प्रवाशांच्या मूलभूत सुरक्षेचा प्रश्न कमालीचा गंभीर बनत चालला आहे. नुकत्याच देशाच्या विविध भागांत घडलेल्या रेल्वे दुर्घटना …

Read More »

कहाणी ‌‘केंट‌’ काराची

केंट कंपनीचे प्रमुख डॉ. महेश गुप्ता यांच्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात एका घरगुती समस्येतून झाली. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात दूषित पाणी प्यायल्यामुळे त्यांच्या मुलांना कावीळ झाली. स्वतः आयआयटी कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेतलेले असल्याने, डॉ. गुप्ता यांनी या आजारपणाच्या मूळ कारणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. बाजारात उपलब्ध असलेल्या यंत्रांचा अभ्यास केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, विरघळलेले हानिकारक घटक आणि जड धातू …

Read More »