लेख-समिक्षण

लेख-समिक्षण

गिलचा झंझावात

इंग्लंडविरुध्दच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताच्या शुभमन गिलने ऐतिहासिक झंझावात करीत २६९ धावांचा विक्रम नोंदविला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्याने एक नवीन सोनेरी पान लिहून ठेवले. २६९ धावांची त्याची ही चमकदार खेळी केवळ वैयक्तिक कामगिरी नव्हे तर संपूर्ण संघासाठी प्रेरणास्थान आहे. गिलने धावांचा डोंगर उभा करताना अनेक दिग्गज फलंदाजांचे रेकॉर्ड मोडीत काढले. या खेळात त्याने सचिन तेंडुलकरची इंग्लंडविरुध्द कसोटीतली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या …

Read More »

‘डेटा लिक’चा वाढता धोका

काळानुसार सायबर गुन्हेगारांनी हॅकिंग आणि चोरी करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणला आहे. त्यामुळे या हल्ल्यापासून कोणीही वाचू शकत नाही, असे म्हटले जात आहे. मग एखाद्याने चूक केलेली असो किंवा नसो. एवढेच नाही तर या सायबर गुन्हेगारांनी पोलिसांना देखील सोडलेले नाही. खात्यातून पैसे गायब करण्याबरोबरच संवेदनशील माहिती चोरण्यासाठी अहोरात्र काम करणारे सायबर गुन्हेगारांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी सजगता हवीच, त्याचवेळी ऑनलाइन असताना …

Read More »

‘लालपरी’ला गरज आर्थिकदृष्ट्या सक्षमतेची

राज्यात प्रवासी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणार्‍या राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. आर्थिक संकटात सापडलेले हे महामंडळ गत ४५ वर्षांत फक्त ८ वेळाच नफ्यात होते. ‘गाव तेथे एसटी’, ‘रस्ता तेथे एसटी’ या घोषवाक्यांसह मिरवणारे हे महामंडळ सध्या १० हजार कोटींच्या वर संचित तोटा सहन करत आहे. महामंडळाची प्रकृती सुधारण्यासाठी, महामंडळाची आर्थिक सद्यस्थिती दर्शविणारी श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली …

Read More »

‘चोकर्स’चा शिक्का पुसला

यश मिळविण्यासाठी माणूस जंगजंग पछाडत असतो. अगदी ओठापर्यंत आलेला घास हिरावला जातो तेव्हा तो निराश होणे साहजिक आहे. अशा वेळी त्याला यश हे पा-यासारखे आहे असे वाटत असते. अनेकवेळा अंतिम रेषेपर्यंत मजल मारूनही अंतिम रेषा ओलांडणे जमत नाही तेव्हा ‘चोकर्स’चा शिक्का बसतो. चोकर्स म्हणजे ऐनवेळी हातपाय गाळणे. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाने हा अनुभव अनेकवेळा घेतला आहे. सुमारे तीन दशके ‘चोकर्स’ची …

Read More »

पद पाकिस्तानला, धक्का भारताला

संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी समितीच्या उपाध्यक्षपदावर पाकिस्तानची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्याच वेळेस संयुक्त राष्ट्रांच्या तालिबान विरोधातील समितीचे प्रमुखपदही पाकिस्तानला देण्यात आले आहे. या दोन्ही बातम्या भारतासाठी धक्कादायक अशासाठी ठरल्या आहेत की, भारतीय खासदारांची सात शिष्टमंडळे जगभरातल्या विविध देशांमध्ये पाकिस्तान कसा दहशतवादाला आश्रय देतो हे त्यांना पटवून देण्यासाठी तिकडे गेली होती, त्यांचे हे दौरे सुरू असतानाच संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद …

Read More »

पुन्हा एकदा संशयकल्लोळ

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी जी ’ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई केली ती निश्चितच अभिनंदनीय असली, तरी आता या कारवाईचा धुरळा खाली बसल्यानंतर संशयाचे जे नवीन धुके निर्माण होऊन पहात आहे त्याचाही विचार करावा लागणार आहे. या संपूर्ण मोहिमेमध्ये देशातील सर्वच राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली असली, तरी काँग्रेस पक्षातर्फे सातत्याने …

Read More »

‘टीम इंडिया’ गरजेचीच

जून महिन्यामध्ये इंग्लंडच्या दौर्‍यावर जाणार्‍या भारतीय क्रिकेट संघाची घोषणा निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर करत असतानाच राजधानी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नीती आयोगाची बैठक होऊन या बैठकीत पंतप्रधानांनी देशातील सर्व राज्यांनी आणि केंद्र सरकारने ‘टीम इंडिया’ म्हणून काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सर्व राज्यांना केंद्र सरकारच्या साथीने ‘टीम इंडिया’ म्हणून काम करण्याचे आवाहन केले असले, तरी …

Read More »

विज्ञानयुगातील दीपस्तंभ

जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वृद्धापकाळाने पुण्यातील निवासस्थानी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक आणि साहित्यिक जगतात मोठी पोकळी निर्माण झाली असून खगोलशास्त्रातील तेजस्वी तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. खगोलशास्त्रातील त्यांचे महत्त्वपूर्ण संशोधन आणि विज्ञानाचा सामान्यांपर्यंत प्रसार करण्याचे कार्य कायम स्मरणात राहील. डॉ. नारळीकर हे ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ मांडणारे एक थोर भौतिकशास्त्रज्ञ …

Read More »

उपहासमर्यादेची आठवण

हास्य हा उत्स्फूर्त मानवी भावनाविष्कार आहे. मानवी जगणे आनंददायी बनण्यासाठी हास्य ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. पण आपल्याला किंवा इतरांना हसू यावे यासाठी एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचा, परिस्थितीचा समाजघटकाचा किंवा ओळखीचा उपमर्द करणे, अवहेलना करणे किंवा अश्लील शेरेबाजी करणे याचा अधिकार कोणालाही दिलेला नाहीये. ही बाब आपल्या कुटुंबाच्या आणि भवतालातल्या संस्कारांमधून मनावर आपोआपच रुजलेली असते. सुसंस्कृत समाजात लोकांमध्ये याबाबतची जाण महत्त्वाची असते. …

Read More »

ऑपरेशन सिंदूरचे वैशिष्ट्य

‘ऑपरेशन सिंदूर’ या अत्यंत महत्त्वाच्या लष्करी कारवाईबाबत घेतलेली संयुक्त पत्रकार परिषद ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच माहितीच्या पारदर्शकतेच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल ठरली आहे. या परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, हवाई दलातील अधिकारी व्योमिका सिंह आणि लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी उपस्थित राहून जनतेसमोर अधिकृत माहिती मांडली. हे तिघेही आपापल्या क्षेत्रातील अत्यंत अनुभवी अधिकारी असून, त्यांनी संयमित आणि स्पष्ट भाषेत …

Read More »